आदमची गोष्ट
आदमची गोष्ट’ हा मानवी मनाचे तळ ढवळणारा, विविध अंगांनी मानवी मनाचे, जगण्याचे दर्शन घडवत अंतर्मुख करणारा सुप्रसिद्ध लेखक संजय सोनवणी यांचा कथासंग्रह आहे. भूत-वर्तमान आणि भविष्य काळात यातील कथांची पात्रे संचार करतात. जीवनविषयक असंख्य अनुत्तरीत प्रश्न उपस्थित करतात. माणसाचे नि धरतीचे आदिम नातेही उलगडून दाखवतात. खर्या अर्थाने यातील प्रत्येक कथा ही माणसाचीच गोष्ट आहे. वाचकांना स्वत:च्याच विश्वात नेत स्वत:लाच शोधण्याची वाट दाखवणारा हा कथासंग्रह वाचायलाच हवा!