मेवाडनरेश महाराणा प्रताप
भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांच्यातील न संपणारा संवाद म्हणजे इतिहास’ असं म्हटलं जातं. अशाच संवादाचा पूल निर्माण करून आजच्या अस्थिरतेच्या, कट्टरतावादाच्या काळात महाराणा प्रताप यांच्या देदीप्यमान आयुष्याचा ओझरता परिचय पंचभाईंनी या पुस्तकातून घडवला आहे. अशी पुस्तकं आपल्या संस्कृतीचा वारसा अधोरेखित करीत असल्यानं त्यांचं महत्त्व कालातीत असतं. युगपुरूष छत्रपती शिवाजीमहाराज यांच्याप्रमाणेच मेवाडनरेश महाराणा प्रताप यांचाही झंजावात आजच्या पिढीपुढं आला पाहिजे आणि त्यासाठी ही कादंबरी खारीचा वाटा नक्कीच उचलेल !