थँक्यू बाप्पा
या कथांतील भावभावनांचं रेखाटन आपल्याला त्या-त्या पात्रात, प्रसंगात घेऊन जातं. अनिल पाटील यांच्या लेखनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते वाचकांना त्यांच्या कथानकात गुंतवून ठेवतानाच व्यापक विचार करण्याची दृष्टिही देतात. ती देताना त्यात कुठेही प्रबोधनाचा, समोरच्याला ‘शिकवण्या’चा आव नसतो. माणसाचं माणूसपण अधिक व्यापक व्हावं अशी निर्मळ तळमळ मात्र खच्चून भरलेली असते.